आजाराला दूर ठेवण्यासाठी आणि आजार झालाच, तर तो आटोक्यात आणण्यासाठी एकच गोष्ट साह्यभूत ठरू शकते ती म्हणजे आहार. योग्य आणि प्रमाणात आहार ही आरोग्याची गुरुकिल्ली ठरू शकते. त्यामुळे आहारातून आरोग्यसंवर्धन कसे करावे याचा वस्तुपाठ डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे यांनी या पुस्तकातून घालून दिला आहे.
साखर, मैदा, मीठ, वनस्पती तूप आणि साबुदाणा ही पाच पंढरी विषे आणि चहा, कॉफी, शीतपेये ही टाळावीत, असा सल्ला त्या देतात. का टाळावीत, याची कारणेही सांगितली आहेत. अमृतासमान कार्य करणाऱ्या दुध, ताक, मधासारख्या घटकांची माहिती मिळते. काय खावे, या विभागात आरोग्यदायी फळांचे महत्त्व त्यांनी विषद केले आहे. सुका मेवाही आरोग्यासाठी चांगला असतो. भाज्यांचे महत्त्व, शूकधान्ये, कडधान्ये आणि डाळी, मसाले यांची उपयुक्तताही समजते.
प्रकाशक : दुर्वांकुर प्रकाशन
पाने : ३३२
किंमत : ३५० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)